समर्थ रामदास स्वामींनी २०५ मनाचे श्लोक सांगितले आणि त्यांचे सर्वोत्तम शिष्य कल्याण स्वामींनी ते लिहून घेतले. ह्या श्लोकांस समर्थ स्वतः मनाची शते असे म्हणत. एकूण २०५ श्लोकांपैकी पहिले २ ते ६६ हे श्लोक कर्मपर श्लोक मानले जातात. श्री मनाचे श्लोक मध्ये ह्या २ ते ६६ कर्मपर श्लोकांवर निरूपण आहे. आजच्या आपल्या खूप स्पर्धात्मक आणि वेगवान आयुष्यात ह्या निरुपणाचा खूप फायदा होऊ शकतो. अनेक मनोव्यापार, मनोविकार ह्यांचा आपण सामना करीत असतो पण त्या सगळ्या प्रकारांचे मूळ आपल्याच मनात आहे, हे स्वतः त्यात डोकावून बघितल्याशिवाय समजत नाही. सर्व वयोगटातील सर्व स्तरातील सर्व वाचकांस हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल आणि एक प्रकारचे आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करेल, असे वाटते. आपल्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामिंप्रति आपली श्रद्धा वाढीस लागावी आणि आपले जीवन सुखकर व्हावे, ही समर्थ चरणी प्रार्थना. नियमीत वाचनासाठी आणि भेट देण्यासाठी उत्तम पुस्तक.
Author: Sameer Limaye | Publisher: BookGanga Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 200